नवी दिल्ली – अयोध्येत (Ayodhya) काल दीपोत्सव आयोजित करण्यात आला होता. त्यानिमीत्त सरयू नदीचा (Sharayu River) किनारा 22 लाख ‘दिव्यां’ने प्रकाशित करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर रविवारी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव (Akhillesh Yadav) यांनी एक्सवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात काही मुले घाटावरील दिव्यांमधून तेल काढून ते आपल्या भांड्यात भरताना दिसत आहेत.
त्या संबंधात अखिलेश यादव यांनी म्हटले आहे की, जिथे गरिबी दिव्यातून तेल काढायला भाग पाडते तिथे उत्सवाचा प्रकाश मंदावतो, आमची एवढीच इच्छा आहे की, सण असा व्हावा की ज्यात केवळ घाटच नाही तर गरिबांचे प्रत्येक घर उजळून निघावे.(diwali)
काल दीपोत्सवाच्या सातव्या वर्षात अयोध्येतील (Ayodhya dip) सरयू नदीच्या काठावर 22 लाखांहून अधिक पणत्या प्रज्वलित करण्यात आल्या होत्या. राम की पायडीच्या 51 घाटांवर 25 हजार कार्यकर्त्यांनी हे दीपप्रज्वलन केले.