अमरावती : प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू नाराज असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून रंगली आहे. अशात आपल्याच सरकार विरोधात आता त्यांनी बॅनरबाजी केली आहे. अमरावतीमध्ये जन एल्गार मोर्चाची हाक बच्चू कडू यांनी दिली आहे. या बनर्जी शेतकऱ्यांच्या या मोर्चात एकूण 10 मागण्या करण्यात येणार आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात हे मोर्चे काढण्यात येणार असल्याची घोषणा बच्चू कडू यांनी केली आहे. बच्चू कडू यांनी शिंदे सरकारला घेरण्याची फुल्ल तयारी केल्याचं बोललं जात आहे.
बॅनरमध्ये लिहिण्यात आहे की,’नाही परवा सत्तेची कारण चिंता आहे शेतकऱ्यांची, बच्चूभाऊ शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा मैदानात “झुकेगा नही साला”… असं या बॅनर्सवर लिहिलं आहे.बच्चू कडू यांच्या मोर्चाची अमरावतीत पोस्टर्स, बॅनर्स लागले आहेत. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालया समोरच हे बॅनर्स झळकले आहेत. त्यामुळे सध्या हे पोस्टर्स चर्चेचा विषय झाले आहेत. दरम्यान, अमरावतीतील संत गाडगेबाब यांच्या समाधीपासून मोर्चाची सुरूवात होणार आहे. या मोर्चात 10 ते 15 हजार शेतकरी सहभागी होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.