मुंबई – ऑस्ट्रेलियात पार पडलेल्या महिलांच्या टी-20 विश्वकरंडक क्रिकेट
स्पर्धेत उपविजेते ठरलेल्या भारतीय महिला संघाचे शुक्रवारी मायदेशात आगमन झाले. मात्र, या संघाचे स्वागत करण्यासाठी विमानतळावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा एकही पदाधिकारी उपस्थित नव्हता, तसेच क्रिकेट चाहत्यांनीही पाठ फिरविली होती.
त्यातच करोना विषाणूंची भीती असल्याने रिकाम्या विमानतळानेच खेळाडूंचे स्वागत केले.
महिला विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेचा प्रथमच अंतिम सामना गाठलेल्या महिला संघाला बलाढ्य ऑस्ट्रेलियाकडून 85 धावांनी पराभव पत्करावा लागला होता.