मुंबई : राज्यात ऐन दिवाळसणाच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले त्यामुळे राज्यातील जनतेचे हाल मोठ्या प्रमाणात होत आहेत. हे आंदोलन थांबावे व एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रूजू व्हावे,यासाठी सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र, एसटी कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. यातच एसटी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाला रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष व माजी कृषी मंत्री सदाभाऊ खोत यांनी पाठिंबा दिला आहे.
एसटी महामंडळाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी एसटी महामंडळाने केपीएमजी संस्थेची नेमणूक केली आहे. खासगीकरण करायचे की उत्पन्नाचे अन्य मार्ग शोधायचे, याचा सल्ला ही संस्था देईल. त्यानंतर पावले उचलली जातील, असे एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. यावर आता मंत्री सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे.
राज्यभरातील एसटी कर्मचार्यांच्या शिष्टमंडळासह मी व आ. @GopichandP_MLC आम्ही मा.मुख्यमंत्री वविरोधीपक्षनेते आदरणीय @Dev_Fadnavis साहेबांची त्यांच्या सागर या शासकिय निवासस्थानी येथे भेट घेतली.यावेळी प्रत्येक विभागातील कर्मचारी आणि महिला प्रतिनिधींनी मागण्यांसह आपली व्यथा मांडली pic.twitter.com/3Q0FCJPxds
— Sadabhau Khot (@Sadabhau_khot) November 18, 2021
ते म्हणाले,एसटीच्या खासगीकरणाची कितीही अफवा उठवली तरी आंदोलन सुरूच राहील. एकही कामगार घरी जाणार नाही, असा इशारा देखील सदाभाऊ खोत यांनी दिला आहे.