मुंबई – शिवसेनेतील 40 आमदारांच्या बंडानंतर आजी-माजी नगरसेवकांनी शिवसेनेला रामराम ठोकून शिंदे गटाशी हात मिळवणी केली. आता 12 खासदारांनीही शिवसेनेचा हात सोडला आहे. त्यामुळे बंडाळीने ग्रस्त शिवसेनेला सावरण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वत: मैदानात उतरले आहेत. त्यांच्याकडून पदाधिकाऱ्यांच्या बैठकांसह मेळावे घेतले जात आहेत.
शिवसेनेची गळती रोखण्यासाठी युवसेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी कंबर कसली आहे. आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रा सुरूवात होत आहे. आदित्य ठाकरे यांच्या शिव संवाद यात्रेवर भाजपचे नेते, आमदार नितेश राणे यांनी टि्वट केलं आहे. राणेंनी एक फोटो टि्वटमध्ये शेअर केला आहे. “रस्त्याचे डांबर पाण्यात विरघळले. तरी आदित्य सेना म्हणते आम्ही करून दाखवले,” असं टि्वट नितेश राणेंनी करुन आदित्य ठाकरे यांची खिल्ली उडवली आहे.
नितेश राणे यांचे ट्विट
रस्त्याचे डांबर पाण्यात विरघळले.. तरी आदित्य सेना म्हणते आम्ही करून दाखवले…. pic.twitter.com/0ZWmSyHydf
— nitesh rane (@NiteshNRane) July 20, 2022