वडूज, (प्रतिनिधी) – खटाव तालुक्यात दुष्काळाची तीव्रता वाढल्याने येरळा नदी प्रवाही करून, 17 बंधारे तात्काळ भरावेत, औंधसह 21 आणि पेडगावसह 16 गावे आणि टेंभू योजनेच्या कामांना गती द्यावी, येरळवाडी धरण वन विभागाच्या प्रभावाखाली नेण्याचा अध्यादेश रद्द करावा, टेंभू, तारळी किंवा उरमोडीच्या पाण्याने येरळवाडी धरण पूर्ण भरावे, या मागण्यांसाठी सर्वपक्षीय खटाव तालुका पाणी संघर्ष समितीच्यावतीने तहसील परिसरात सलग दुसर्या दिवशी, मंगळवारी उपोषण व धरणे आंदोलन करण्यात आले.
राष्ट्रवादीचे प्रभाकर देशमुख, काँग्रेसचे रणजितसिंह देशमुख, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष नंदकुमार मोरे, माजी सभापती संदीप मांडवे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. संतोष गोडसे, शशिकला देशमुख, उपनगराध्यक्ष मनोज कुंभार, राष्ट्रवादी युवक शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष मकरंद बोडके, माजी नगराध्यक्ष महेश गुरव, एस. पी. देशमुख, अर्जुन खाडे,
पेडगावचे माजी सरपंच अंकुश दबडे, मायणीचे उपसरपंच दादा कचरे, प्रा. नागनाथ स्वामी, डॉ. महेश माने, येरळवाडीचे सरपंच योगेश जाधव, दत्तूकाका घार्गे, अर्जुन गोडसे, तानाजी देशमुख, सूर्यभान जाधव, अशोक बैले, परेश जाधव, अॅड. राजीव चव्हाण, तानाजी वायदंडे, संतोष देशमुख, धनंजय काळे, अजित नलावडे, प्रमोद पावडे, गणेश भोसले आणि विविध गावांमधील ग्रामस्थांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. ‘पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’, ‘कोण म्हणतंय देत नाय, घेतल्याशिवाय राहत नाय’, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.