(नीलकंठ मोहिते)
रेडा – प्रशासनाच्या नियम व अटी नुसारच उजनी जलाशयातून पुण्यातून येणारे सांडपाणी पाच टीएमसी इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना दिले होते.मात्र राजकीय विरोधकांनी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या विचाराचा इंदापूर तालुका कायम परिपक्व होईल या भीतीने,चुकीच्या पद्धतीने आडकाठी आणून झालेला पारित आदेश रद्द केला आहे.या निर्णया मुळे सगळ्यात जास्त नुकसान 22 गावातील शेतकऱ्यांचे होणार आहे. अक्षरशः शेतकरी उध्वस्त होणार आहे.त्यामुळे शेतकऱ्यांचा शासनाने विचार करावा असे आवाहन अकलूज सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सोमेश्वर वाघमोडे यांनी केले आहे.
इंदापूर तालुक्यातील काटी गावात नीरा भीमा कारखाना चौकात परिसरातील शेतकऱ्यांनी इंदापूर तालुक्यातील हक्काचे पाच टीएमसी पाणी मिळण्याचा आदेश जलसंपदा मंत्री यांनी रद्द केल्यामुळे,(गुरुवार ता. 20 मे रोजी) रस्ता रोको करत टायर पेटवून शासनाच्या विरोधात त्रागा व्यक्त केला आहे.यावेळी अकलूज कारखान्याचे माजी संचालक व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सोमेश्वर वाघमोडे बोलत होते.युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते साहेबराव मोहिते,हेमंतराव वाघमोडे, प्रा.बाळासाहेब लोखंडे, विठ्ठल मरगळ,महादेव मासाळ,सुभाष पाटील, वैभव वाघमोडे,दादासाहेब भोसले,दत्तात्रय माने,वसंत भोसले,सोमनाथ मोहिते,शिवाजी बनसोडेे,डॉक्टर अमोल गोरे,सचिन बोराटे,प्रमोद थोरात,हनुमंत वाघमोडे बाळासाहेब वाघमोडे,सुहास पवार,भारत सोलनकर,पप्पू मासाळ,साहेबराव भोसले,अतुल भोसले,विशाल भोसले, यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
पुढे बोलताना वाघमोडे म्हणाले की, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांची खऱ्या अर्थाने नड ओळखून पाच टीएमसी पाणी तालुक्यातील 22 गावासह इतर एकूण 60 गावाला शेती सिंचित करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून हक्काचे पाणी निर्माण केले होते. या अभिनव योजनेला दृष्ट काही नाटाळ राजकर्त्यांनी लावल असून,यामध्ये प्रत्येक गावातील शेतकरी भरडला जाणार आहे.हे पाणी सोलापूर जिल्ह्याच्या वाट्याचे अजिबात नाही.तरीदेखील चुकीचा गैरसमज करून इंदापूर तालुक्याच्या हक्काचे पाणी हिसकावण्याचा प्रयत्न सोलापूरकर करत आहेत.हा प्रयत्न इंदापूर तालुक्यातील शेतकरी हाणून पाडतील असाही इशारा सोमेश्वर वाघमोडे यांनी दिला आहे.
राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे शेतकऱ्यांचे वालीच राहणार –
इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या भल्यासाठी पडीक शेती बागायती करण्यासाठी राज्यमंत्री भरणे यांनी पाच टीएमसी पाणी तालुक्यात आणण्याचे धोरण पर्फेक्ट राबवले होते.परंतु काही राजकीय विरोधकांनी केवळ राजकीय आकसापोटी चुकीची माहिती पुढे करत या योजनेला खोडा घातला आहे.तालुक्यातील तमाम शेतकरी राज्यमंत्री भरणे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्यामुळे,भरणे हे शेतकऱ्यांचे वालीच राहणार त्यामुळे शेतकऱ्यांनी खचून न जाता आपल्याला न्याय मिळण्यासाठी संघर्षात सामील व्हावे.असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे युवा नेते हेमंतराव वाघमोडे यांनी केले आहे.
पाणी आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे –
इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी आहे हे सोलापूरकरांच्या बापाचे नाही.अशा गगनभेदी घोषणा शेतकऱ्यांनी रस्ता रोको मध्ये केल्या.तसेच टायर पेटवून शेतकऱ्यांनी आक्रोश व्यक्त केला.भरणे मामा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है आशा देखील घोषणा शेतकऱ्यांनी दिल्या.