कोलंबो – श्रीलंकेमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर तब्बल 2 लाख 45 हजार जणांना विस्थापित व्हावे लागले आहे.
मरण पावलेल्या 14 पैकी 5 जणांचा मृत्यू राजधानी कोलंबोपासून 88 किलोमीटर अंतरावर असलेल्या केगले येथे झाला आहे. तर तिघेजण रत्नापुरा जिल्ह्यात मरण पावले. अन्य दोघेजण बेपत्ता आहेत आणि दोघे जखमी झाले आहेत. 15,658 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविले गेले आहे तर 800 घरांचे नुकसान झाले आहे.
येत्या काही दिवसांत 150 मि.मी. जोरदार धबधबा पडण्याची शक्यता आहे आणि नागरिकांनी मुसळधार पावसापासून विशेषत: विजा पडण्यापासून सावध राहावे, असे श्रीलंकेच्या हवामान खात्याने आपल्या ताज्या हवामान विशयक अहवालात म्हटले आहे.
दरम्यान, वाढत्या पावसानंतर कोलंबोच्या किनाऱ्याजवळील सपुगस्कंद तेल शुद्धीकरणगृहातून टाक्यांमधून केळणी नदीत मिसळल्या जाणाऱ्या भट्टी तेलाचा धोका नाही, असे श्रीलंका नौदलाने म्हटले आहे. शनिवारी झालेल्या पावसेनंतर ही गळती सुरू झाली होती.