मुंबई – राष्ट्रवादी काॅंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर जाऊन शरद पवार यांनी भेट घेतली. दरम्यान, या भेटीबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार, शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासह राज्यातील काही महत्वाच्या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी ही भेट घेतली असल्याचे सांगितले जात आहे. मात्र या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या भेटीनंतर राज्यात मोठी राजकीय घडामोड पाहायला मिळू शकते, असा देखील काही जण तर्क लावत आहेत.