मुंबई – राज्यात दिवसेंदिवस नवीन करोनाबाधित रुग्णांची संख्या घटत असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असल्याने राज्याचा रिकव्हरी रेट 94 टक्क्यांवर पोहोचला आहे. राज्यात दिवसभरात 6 हजार 53 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत एकूण 17 लाख 89 हजार 958 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. राज्यात आज 2,834 नवीन रुग्ण आढळले, तर 55 जणांचा मृत्यू झाला आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 21 लाख 57 हजार 953 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 18 लाख 99 हजार 352 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 4 हजार 938 व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत.
तर 3 हजार 579 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात आज घडीला 59 हजार 469 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आज राज्यात 2 हजार 834 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 18 लाख 99 हजार 352 इतकी झाली आहे. राज्यातील मृत्यू दर हा 2.57 टक्के इतका आहे.