कोलकाता – सलामीवीर फलंदाज लोकेश राहुल याने जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. खरेतर त्याला कसोटी क्रिकेट संघात स्थान दिले गेले पाहिजे, असे मत भारताचा माजी कसोटीपटू दीपदास गुप्ता याने व्यक्त केले आहे.
गेल्या वर्षी झालेल्या टी-20 व एकदिवसीय सामन्यांच्या मालिकांमध्ये राहुलने अनेकदा आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. राहुलकडे यष्टिरक्षणाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली. त्यानेही अत्यंत चांगल्या पद्धतीने ही जबाबदारी पेलली. मग हाच प्रयोग कसोटी क्रिकेटमध्येही का केला जात नाही, असेही त्याने व्यक्त केले.