नवी दिल्ली – न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत दारुण पराभवाचा सामना करावा लागलेल्या भारतीय संघावर अशा पराभवाची नामुष्की जवळपास साठ कसोटी सामन्यांनंतर आली आहे. हीच निराशाजनक नोंद आता कर्णधार विराट कोहलीच्या नावावर जमा झाली आहे.
दोन सामन्यांची कसोटी मालिका यजमान न्यूझीलंडने 2-0 अशी जिंकली. दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताला 7 गड्यांनी तर, त्यापूर्वी पहिल्या कसोटीत 10 गड्यांनी पराभव पत्करावा लागला आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने दिलेल्या 132 धावांचे आव्हान न्यूझीलंडने सहज पार केले.
कर्णधार कोहलीसाठी ही मालिका अत्यंत निराशाजनक ठरली. रनमशीन अशी ख्याती असलेल्या कोहलीला या मालिकेत एकेक धाव घेतानाही संघर्ष करावा लागत होता. कोहलीपेक्षा जास्त धावा वेगवान गोलंदाज महंमद शमीने केल्या ही त्याहीपेक्षा लज्जास्पद
बाब ठरली.