नवी दिल्ली – देशात कोविड 19 चे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93 पूर्णांक 9 शतांश टक्के झाले आहे. काल दिवसभरात देशात 42 हजाराहून अधिक रुग्ण बरे झाले. आतापर्यंत एकूण 82 लाखाहून अधिक रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.
गेल्या 24 तासात 41 हजारहून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे देशातली एकूण बाधितांची संख्या 88 लाखापेक्षा अधिक झाली आहे. देशातले करोनामुळे होणाऱ्या मृत्युचा दरही 1 पूर्णांक 47 टक्के एवढाच असून तो जगात सगळ्यात कमी असल्याचही आरोग्य विभागाने म्हटले आहे.
राज्यात काल 2 हजार 707 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत 16 लाख 12 हजार 314 रुग्ण संसर्गमुक्त होऊन घरी परतले आहेत, राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर 92 पूर्णांक 41 शतांश टक्के झाला आहे. काल 4 हजार 237 नवीन रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यात करोना बाधितांची एकूण संख्या 17 लाख 44 हजार 698 झाली आहे.
सध्या 85 हजार 503 रुग्ण उपचार घेत आहेत. काल 105 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून, मृत्यू दर 2 पूर्णांक 63 शतांश टक्के एवढा आहे.