पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरने म्हटले आहे की, ती गुप्तहेर नाही आणि तिचा तसा कोणताही हेतू नाही. ती भारताच्या सचिनच्या प्रेमात आहे आणि आता ती कायमचं पाकिस्तान सोडून आली आहे. तिने भारताला आपला देश म्हणून स्वीकारले आहे आणि सचिनचे कुटुंब हे तिचे स्वतःचे कुटुंब ती मानत आहे. आता ती इथून कुठेही जाणार नाही. येण्याची पद्धत चुकीची होती, त्याची शिक्षा भोगायला मी तुरुंगात जाण्यास तयार आहे, असेही मीनाने म्हंटले आहे.
सीमा म्हणाली- विचार चुकीचा असता तर ती कधीच मुलांसोबत आली नसती
इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत सीमाने सांगितले की, तीच्यावर गुप्तहेर असल्याचा संशय घेणे चुकीचे आहे. जर ती गुप्तहेर असती तर चार लहान मुलांना घेऊन ती एकटीच भारतात आली असती. सीमा म्हणाली, “इन्स्टाग्राम आणि फेसबुक ही सोशल मीडिया अॅप्स कोणीही वापरू शकतो. मला इंग्रजीतील काही शब्द क्वचितच वापरता येतात आणि मी संगणकही वापरू शकत नाही.”
सनी देओलच्या ‘गदर’ चित्रपटाप्रमाणे –
तीने हिंदू प्रथा पूर्णपणे स्वीकारल्या आहेत. आणि तिच्यावर अशी शंका घेणे योग्य नाही. आता तिला भारतीय नागरिक व्हायचे आहे, असे ती म्हणत आहे. तिने सांगितले की तिला भारताची संस्कृती आवडते आणि लोकांनी तिला भारतीय स्त्री म्हणून स्वीकारावे अशी इच्छा आहे. मला कोणत्याही प्रकारची भीती नसल्याचे तिने सांगितले. सीमाने सनी देओल आणि अमिषा पटेल यांचा गदर हा हिंदी चित्रपटही पाहिला आहे. ती म्हणाली की तीला तो खूप आवडला.
बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश केल्याच्या आरोपावरून सीमाला 4 जुलै रोजी अटक करण्यात आली होती. 2019 मध्ये ऑनलाइन PUBG गेम खेळत असताना ती ग्रेटर नोएडा येथील रबुपुरा येथील रहिवासी सचिनच्या संपर्कात आली आणि त्याच्या प्रेमात पडली.
तिने भारतात येण्यासाठी नेपाळचा व्हिसा घेतला आणि शारजामार्गे नेपाळला पोहोचली. यादरम्यान ती काठमांडूमध्ये पहिल्यांदाच सचिनला समोरासमोर भेटली. तेथे दोघेही एका हॉटेलमध्ये सात दिवस राहिले. यानंतर सीमा पाकिस्तानात परतली आणि पुन्हा चारही मुलांसह नेपाळमार्गे भारतात आली. सचीन आणि मीना या दोघांनी भारतीय परंपरेनुसार लग्न केले असून ती आता पूर्णपणे भारतीय हिंदू महिलेच्या पेहरावात राहत आहे.