रायपुर – भारत आणि चीन यांच्यात सध्या सीमेवर जो संघर्ष सुरू आहे त्याला पंडित जवाहरलाल नेहरू आणि कॉंग्रेस पक्ष जबाबदार आहे असा आरोप मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह यांनी केला आहे. या विषयावरून कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याकडून सरकारला जे प्रश्न विचारले जात आहे त्यातून लष्कराचे मनोधैर्य खच्ची होत आहे असा दावाही त्यांनी केला आहे.
मोदी सरकारने चीनच्या सरहद्दीलगत रस्ते बांधणी केल्याने चीनचे पित्त खवळले आहे, या आधी भारताच्या कोणत्याहीं पंतप्रधानांनी चीन हद्दी लगत रस्ते बांधणी केली नव्हती असा दावाहीं चौहान यांनी केला.
भारताची शक्ती वाढत असून ती अशीच वाढत राहीली तर ते आपल्याला एकेदिवशी पराभूत करतील अशी भीती चीनला वाटत असल्याने त्यांनी भारताच्या विरोधात कारवाया सुरू केल्या आहेत असेही चौहान यांनी भाजप कार्यकर्त्यांना संबोधीत करताना सांगितले.