सातारा – खंडाळ्याच्या हक्काचे नीरा देवघरचे पाणी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बारामतीला पळवले. या भागाचे पाणी पळवणाऱ्यांना आगामी निवडणुकांत साथ देवू नका. 12 वर्ष आमदार असताना नीरा देवघरच्या कॅनॉलचे काम न करणाऱ्यांना जनतेने जाब विचारायला पाहिजे. हे काम पंतप्रधान जलजीवन योजनेतून पूर्ण करून खंडाळ्याचा पाणी प्रश्न भाजपा लवकरच सोडवणार आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत खंडाळा तालुक्यात भाजपाचे सर्व उमेदवार विजयी करा, असे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा पंधरावडा व खंडाळा तालुका संवाद यात्रेत ते भादे व खेड बुद्रुक येथे गोरे बोलत होते. यावेळी भादे येथील भाजपा शाखा फलकाचे आनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी किसनवीरचे माजी चेअरमन मदनदादा भोसले, माजी समाज कल्याण सभापती आनंदराव शेळके, अनिरुध्द गाढवे, युवती जिल्हाध्यक्षा सुरभी भोसले, बापुराव धायगुडे, अजय धायगुडे, बाळासो जाधव, ऋषीकेश धायगुडे, देवीदास चव्हाण, गिताजंली क्षीरसागर उपस्थित होते.
जयकुमार गोरे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. खंडाळा तालुक्याचा सर्वांगिण विकास भाजपच करु शकते, हे आगामी काळात दिसून येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादीच्या भुलथापांना बळी न पडता पंतप्रधान मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी साथ द्या, असे ते म्हणाले.
मदन भोसले म्हणाले, जयकुमार गोरे यांनी पक्षवाढीसाठी या संवाद यात्रेचे आयोजन केले असून भादे व खेड बुद्रुक गटातील प्रश्न सोडवण्यासाठी मी कार्यकर्त्यांना सर्वतोपरी सहकार्य करणार आहे. रामदास शिंदे, भाऊसो शेळके, बाळासो जाधव, संदीप शेळके, हर्षवर्धन शेळके, कोपर्डे सरपंच दिपक शिंदे, निंबोडी सरपंच सोपान शेळके,भादे उपसरपंच विशाल गायकवाड, श्रीधर सोनवलकर आदी उपस्थित होते.