छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी एक धक्कादायक घटना घडवली आहे. येथे नक्षलवाद्यांनी भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते आणि माजी सरपंच काका अर्जुन यांची निर्घृण हत्या केली. नेत्याची हत्या केल्यानंतर नक्षलवाद्यांनी मृतदेह रस्त्याच्या मधोमध टाकून दिला. एवढेच नाही तर मृतदेहावर चेतावणीचे नक्षलवाद्यांनी पत्रकेही फेकली आहे.
नक्षलवाद्यांनी सोडलेल्या पत्रात लिहिले आहे की,’काका अर्जुन यांनी आम्ही दिलेल्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे आणि राजकारणात सक्रिय सहभाग घेतल्याने आम्हीच त्यांची हत्या केली असे लिहिले आहे. या हत्येचा निषेध करताना छत्तीसगड भाजपचे सरचिटणीस ओपी चौधरी म्हणाले की, ‘काँग्रेसच्या पाठिंब्याशिवाय काका अर्जुन यांची हत्या होऊ शकत नाही. तसेच या हत्येला राजकीय हत्या म्हटले गेले.’
मिळालेल्या माहितीनुसार, नक्षलवाद्यांनी बीजापूर मुख्यालयापासून सुमारे ५२ किमी अंतरावर भाजपा नेत्याची हत्या केली. नक्षलवाद्यांनी दबा धरून अर्जुन यांच्यावर हल्ला केला. काक अर्जुन घरातून बाहेर पडताच हत्यारबंद नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांची हत्या केली. काका अर्जुन यांनी इल्मीडी गावातील माजी सरपंच होते.