मुंबई – महाराष्ट्रातील 12 आमदारांच्या निलंबनाबाबत सुप्रीम कोर्टाचा आदेश शनिवारी (दि. 29 जानेवारी 2022) उपलब्ध झाला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी आपली भूमिका मांडली. या आदेशामधील परिच्छेद क्रमांक 74,75,76 वाचल्यांनतर स्पष्ट होते की, या आमदारांच्या वागणुकीवर सुप्रीम कोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे. कोणत्याही आमदाराची अशा प्रकारची वागणूक ही कधीही स्वीकारली जाणार नाही, असे नवाब मलिक म्हणाले.
12 आमदारांच्या शिक्षेच्या कालावधीसंदर्भात सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला होता. मात्र हा निर्णय वाद निर्माण करणारा असून देशात पार्लमेंट सुप्रीम व ज्युडीशीअल सुप्रीम यात वारंवार वादविवाद होतात. मात्र 12 आमदारांच्या वागणुकीबाबत सुप्रीम कोर्टाने त्यांना सुनावले आहे हे भारतीय जनता पार्टीला कळले पाहीजे, अशी टीका नवाब मलिक यांनी केली.