नारायणगाव – संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या 177 दुचाकी व चारचाकी वाहनांवर नारायणगाव पोलिसांनी कारवाई केली आहे, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी दिली. नारायणगाव व वारूळवाडी परिसरात विनाकारण फिरणारे दुचाकी व चारचाकी वाहनचालक यांच्यावर शुक्रवारी (दि. 10) 105 व शनिवारी (दि. 11) 72 वाहनांवर कारवाई करून 44 हजार 300 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
करोना व्हायरसचे होणारे दुष्परिणाम याचे गांभीर्य अद्यापही काही नागरिक नसून ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत विनाकारण गावात, महामार्गावर दुचाकी अथवा चारचाकी घेऊन फिरत आहेत. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर न पडता घरातच राहून आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. ही कारवाई अर्जुन घोडे, उपनिरीक्षक अभिजित पवार, पोलीस हवालदार एच. सी. काठे, श्यामसुंदर जायभाये, ए. सी. तांबे, जी. एम. कोतकर, एम. जी. शेख, होमगार्ड कुऱ्हाडे, राजगुरू, काशिद यांनी केली.