मुंबई – छत्रपती संभाजीनगर आणि मुंबईतील काही भागात जो राडा झाला त्यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाष्य केलं. दोन्हही ठिकाणची परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे. दोन्हही घटनांना धार्मिक स्वरूप आहे का असं वाटायला लागलं आहे. असं पवार म्हणाले होते. यावर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिल आहे. पवार यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल त्यांनी चिंता व्यक्त करू नये असं राणे म्हणाले आहेत.
कोणाचीही ,मन दुखावतील असं बोलायला नको असं मला वाटत. आता सरकार पवारांचं राहिलेलं नाही त्यांचं सरकार असताना लोकांना जास्त चिंतीत टाकलं होतं असा टोला राणेंनी यावेळी लगावला. माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्यातील विविध गोष्टींबाबत भाष्य केले.
नारायण राणे पुढे म्हणाले,” त्यांचं सरकार होत त्यावेळी लोकं चिंताग्रस्त होती. कारण राज्याला मुख्यमंत्रीच नव्हता. तुम्ही म्हणाला उद्धव ठाकरे कोण होते? तर ते मातोश्रीचे मुख्यमंत्री होते,अशी टीका करत शरद पवार यांना अभिप्रेत असं राज्य आणि कारभार लवकरच दिसेल असं राणे यावेळी म्हणाले.
सावरकरांबाबत देखील पवारांनी केलं भाष्य
नागपूर दौऱ्यादरम्यान पत्रकरांशी संवाद साधताना शरद पवार म्हणाले की, “आज सावरकर हा राष्ट्रीय मुद्दा नाही. ही जुनी गोष्ट झाली आहे. आपण सावरकरांच्या विरोधात काही गोष्टी बोललो होतो. पण ती वैयक्तिक नव्हती, हिंदू महासभेबद्दल होती. देशात लोकांच्या हिताचे मोठे प्रश्न आहेत, त्यामुळे सावरकरांच्या मुद्यावर जोर देण्याची गरज नाही. मात्र देशाच्या स्वातंत्र्यासाठी सावरकरांनी केलेल्या बलिदानाकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही.”