मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या मशिदीवरील भोंगे खाली उतरवण्याच्या आवाहनानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. राज ठाकरेंनी भोंगे काढण्यासंदर्भात ३ मेचा अल्टिमेटम दिला असताना राज्य सरकारनं त्याला विरोध केला आहे. या मुद्यावरून राजकीय नेत्यांसह, सर्व सामान्य लोकांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे.
आता दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना देखील माध्यमांनी भोंग्यांच्या राजकारणाविषयी प्रश्न विचारता आपली भूमिका ठामपणे मांडली आहे. ते म्हणाले,’माझ्या मताने किंवा उत्तराने काय बदलणार आहे?मी माझं मतं नेहमीच मांडतो. प्रेम हाच जगण्याचा मार्ग आहे. एकमेकांवर प्रेम करत रहावं. पण मी असं म्हटल्यावर देखील आपली भांडणं होतच राहणार आहेत.’ असं म्हणत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
दरम्यान, भोंग्यांच्या मुद्द्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 3 मे पर्यंत राज्य सरकारला अल्टिमेटम दिल्यानंतर आता राज्य सरकारची धावाधाव सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे.