मुंबई – अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे विभागीय संचालक समीर वानखेडे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. क्रुज ड्रग्ज प्रकरणात आर्यण खानला अटक झाल्यानंतर वानखेडे यांचे लोक कौतुक करताना दिसून येत आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्यासह काही लोक त्यांच्यावर प्रश्न उपस्थित करत आहेत. मलिक यांनी वानखेडे यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. त्यामध्ये वानखेडे यांच्या जातीचा मुद्धा, लग्न, लाच असे अनेक आरोप त्यांच्यावर लावण्यात आले आहे. त्यामध्ये वानखेडे हिंदू की मुस्लीम या मुद्याला सुद्दा जोर लावण्यात आला होता यावर वानखेडे यांच्या वडीलांनी प्रतिक्रिया दिली आहे.
माझा मुलगा महाभारतातील अभिमन्यूप्रमाणे शत्रूंच्या चक्रव्यूहात अडकला आहे. अभिमन्यू चक्रव्यूहातून बाहेर पडू शकला नव्हता, पण माझा मुलगा यातून मार्ग काढू शकेल याची मला खात्री आहे. असा विश्वास ज्ञानदेव वानखेडे यांनी व्यक्त केला आहे. ते एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
समील वानखेडे यांचे वडील म्हणाले की, तो खूप अस्वस्थ आहे. माझं संपूर्ण कुटुंब अस्वस्थ आहे. यामागे एकच व्यक्ती आहे, ती म्हणजे- नवाब मलिक. समीरचा दोष एवढाच आहे की त्याने नवाब मलिकांच्या जावयाला (समीर खान) ड्रग्ज प्रकरणात अटक केली आणि त्याने (समीर खान) आठ महिने तुरुंगात काढले. मी एका हिंदू कुटुंबातून आलो आहे. एका मुस्लिम महिलेसोबत (समीर वानखेडे यांची आई) मी आंतर धर्मीय प्रेमविवाह केला होता. सहा वर्षांपूर्वी माझ्या पत्नीचा मृत्यू झाला.”