पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – यूपीएससी निकालात मुंबईचा कुश मोटवानी हा महाराष्ट्रात टाॅपर ठरला आहे. देशात ११ वा रॅंक मिळविलेला आहे. एकूण निकालात यंदा निवड झालेल्या उमेदवारांची संख्या ८ ते १० टक्क्यांच्या आसपास आहे. यूपीएससी उत्तीर्णांमध्ये महाराष्ट्राचा आणखी टक्का वाढला पाहिजे, अशी अपेक्षा स्पर्धा परीक्षा संस्थांकडून करण्यात येत आहे.
यूपीएससी परीक्षेद्वारे आयएएस अर्थात भारतीय प्रशासकीय सेवा, आयपीएस अर्थात भारतीय पोलीस सेवा, आयएफएस अर्थात भारतीय परराष्ट्र सेवा व गट अ आणि गट ब मधील इतर केंद्रीय सेवांसाठी निवड केली जाते. त्याचा आज निकाल जाहीर झाला. यात महाराष्ट्रात विद्यार्थी यूपीएससी परीक्षेत चमकले आहेत.
युनिक अकॅडमचे यशवंत : वर्दाह खान (रँक – 18), राम्या आर. ( 45), नेहा राजपूत ( 51), जान्हवी शेखर (रँक 145), आशिष पाटील (147), शिशिर श्रीराम (155), अभय डागा (185), भगत नंदन (245), अभिषेक टाले ( 249), शारदा मद्यस्वार ( 285), हर्षल घोगरे (308),
वृषाली कांबळे ( 310), नील शर्मा ( 316), शुभम थिटे ( 359), मंगेश खिलारी ( 414), मयुर गिरासे ( 422), आदिती चौगुले ( 433), लोकेश पाटील ( 496), सागर भामरे ( 523), मानसी साकोरे (531), अपूर्व बाळपांडे ( 546), शुभम पवार ( 560), प्रियंका मोहिते ( 595), आविष्कार देर्ले ( 604), नम्रता घोरपडे ( 675), सुरज निकम ( 706), अभिजित पाखरे ( 720) यांच्यासह एकूण 45 उमेदवारांचा समावेश आहे, अशी माहिती संचालक तुकाराम जाधव व मल्हार पाटील यांनी व्यक्त केली.
चाणक्य मंडलचा समर्थ शिंदे २२ व्या वर्षी गुणवंत
यूपीएससी परीक्षेत भारतात दुसरा आलेला अनिमेश प्रधान, सहावी आलेली सृष्टी डाबस व महाराष्ट्रात पहिला आलेला कुश मोटवानी यांनी चाणक्य मंडल परिवारमध्ये परीक्षेच्या विविध टप्प्यांवर मार्गदर्शन घेतले आहे. चाणक्य मंडल परिवारच्या यूपीएससी कोर्सचा विद्यार्थी समर्थ शिंदे याने पहिल्याच प्रयत्नात वयाच्या केवळ २२ व्या वर्षी देशात २५५ वा रँक मिळवला आहे, अशी माहिती चाणक्य मंडल परिवारकडून देण्यात आली.
बार्टी संस्थेतील १६ उमेदवार चमकले
संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) च्या विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. या निकालात बार्टी संस्थेच्या एकूण १६ उमेदवारांची निवड झाली आहे.