मुंबई: मुंबई महानगरपालिकेचे भाजप – शिवसेना खाजगीकरण करण्याचा डाव आखत असून, ३० हजार कोटीचे बजेट असताना मनपा आर्थिक संकटात कशी येऊ शकते असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
महापालिका आयुक्तांनी अतितात्काळ परिपत्रक काढले आहे. मलिक यांनी यावेळी ‘अतितात्काळ’ परिपत्रकाचा आदेश माध्यमांसमोर सादर केला आहे. मुंबई मनपा कार्यालयातून परिपत्रक पाठवण्यात आले आहे. त्यामध्ये २०१९ – २० बजेटमध्ये महसुली उत्पन्नात घट व महसुली खर्चात वाढ झाल्यास मनपा आर्थिक संकटात येवू शकते असा. मग मनपाचे बजेटमधील पैसे खर्च झाले कुठे असा सवालही नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री @Dev_Fadnavis, भाजपाचे सदस्य @PrasadLadInd आणि शिवसेना-भाजपचे समन्वयक म्हणून ओळख असलेले निरज गुंडे यांनी मुंबई महानगरपालिकेला लुटले आहे. @ShivSena – @BJP4Maharashtra या दोन्ही पक्षांनी मुंबई महानगरपालिकेचे खासगीकरण करण्याचा डाव आखला आहे – @nawabmalikncp pic.twitter.com/s4e68ZELtd
— NCP (@NCPspeaks) October 3, 2019
मलिक म्हणले की, भाजपचे ठेकेदार प्रसाद लाड हे मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहेत तर नीरज गुंडे हा प्रसाद लाड यांच्याजवळचा ठेकेदार असून तो सध्या मनपाची कामे घेत आहेत. खाजगीकरण करुन मनपा आयुक्त व ठेकेदार मनपाच्या कर्मचाऱ्यांना घरी पाठवण्याचे कटकारस्थान आहेत. तसेच प्रसाद लाड यांच्या जवळच्या ठेकेदारांना ठेका दिला गेला आहे.
निरज गुंडे कोण आहे? ते मुख्यमंत्र्यांच्या घरी का जातात? मातोश्रीवर त्यांची ये-जा का असते? याची उत्तरे द्यावीत. मुंबई मनपामध्ये प्रसाद लाड, निरज गुंडे यांची ठेकेदारी सुरू आहे. भविष्यात सगळ्या कामगारांना काढून आपल्या माणसांची भरती करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे – @nawabmalikncp pic.twitter.com/5zFFxvoIjW
— NCP (@NCPspeaks) October 3, 2019
आता आयुक्तांनी काढलेल्या नोट मध्ये असा डाव असून थकीत कर वसुली करण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय आयटी व तंत्रज्ञानाचा वापर करा असे आदेश देण्यात आले आहेत. जेणेकरुन नागपुरच्या कंपनीला म्हणजेच मुख्यमंत्री यांच्या जवळच्या कंपन्यांना कामे मिळावी यासाठी हे धोरण राबविले जात असल्याचाही आरोप नवाब मलिक यांनी केला.