वाल्हे: पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होण्याचे संभाव्य धोके टाळण्यासाठी महावितरणकडून दरवर्षी देखभाल व दुरुस्तीचे कामे केली जातात. त्या अनुषंगाने वाल्हे (ता.पुरंदर) येथे वीज महावितरणच्या वतीने, ‘एक गाव एक दिवस’ या उपक्रमातुन वीजवाहिनीची देखभाल दुरूस्तीची कामे करण्यात आली.
बारामती परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनिल पावडे यांच्या संकल्पनेतून साकार झालेला हा उपक्रम म्हणजे ग्राहकाभिमुख सेवा देण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. वाल्हे परिसरामधील प्रामुख्याने वीजवाहिन्यांना स्पर्श करणाऱ्या झाडांच्या लहान फांद्या तोडून टाकणे, तुटलेले पीन व डिस्क इन्सूलेटर्स बदलणे, वितरण रोहित्रांचे अर्थिंग तपासणे, ऑईल फिल्टरेशन, खांब आणि तारांचे मजबुतीकरण, वीज खांब, तारा बदलणे किंवा झोल काढणे, जुन्या फिडर पिलरमध्ये इन्सूलेशन स्प्रे मारणे तसेच पावसाचे पाणी साचणाऱ्या परिसरातील फिडर पिलरची जमिनीपासून उंची वाढविणे, पोल सरळ करणे, घरावरील विद्युत तारा उचवणे जेणेकरून अपघात होऊ नये. डिस्ट्रीबिटिव्ह बाॅक्स बदलणे, दुरुस्ती करने अशा विविध प्रकारच्या कामांचा समावेश आहे. रोहित्र तसेच वीजयंत्रणेच्या ठिकाणी नागरिकांनी टाकलेला कचराही या मोहिमेत साफ करण्यात येत आहे.
अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली, कार्यकारी अभियंता अरविंद वनमोरे, उपकार्यकारी अभियंता बाळासाहेब फासगे,कनिष्ठ अभियंता वाल्हे विश्र्वती मांगुळकर, लाईनम अमोल जाधव, जनमिञ रवींद सुर्यवंशी, हनुमंत शिंन्दे, विवेक बर्डे,सतिश गायकवाड ,रविंद्र माने,दत्तात्रय पवार, राहूल भुजबळ, सनी ढमढेरे, अमोल चव्हाण आदी कर्मचारी कर्मचारीवर्गाने वीज वाहिनीची देखभाल व दुरूस्तीची मोहिम राबविली.
“पावसाळा सुरू होतांना सुटणारा सोसाट्याचा वाऱ्याने तारा एकमेकांवर घासल्या जावून अथवा झाडांमध्ये घासून शॉर्टसर्किट होण्याची शक्यता असते, त्यासाठी तारांवर येणाऱ्या झाडाच्या फांद्या तोडणे गरजेचे असते तसेच तारांमधील झोळ कमी करणे गरजेचे असते. त्यासाठी पावसाळ्या पुर्वी ही मोहिम हाती घेतली जाते. अन्यथा पावसाळ्यात वादळ वारे सुरू होताच वीजेच्या लपंडावाला सामोरे जावे लागते, यासाठी झाडांची छाटणी तारांचे झोळ काढणे आदी कामे, विजेचा लपंडाव टाळण्यासाठी पावसाळ्या पुर्वी ही मोहिम राबविली जाते”; असे वाल्हे शाखेच्या कनिष्ठ अभियंता विश्र्वती मांगुळकर यांनी सांगितले.