Modi’s guarantee । भाजपने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्यात केंद्रात सरकार स्थापन केल्यानंतर संपूर्ण देशात समान नागरी संहिता म्हणजेच UCC लागू करणार असल्याचे आश्वासन भाजपने दिलंय. जाहीरनामा प्रसिद्ध करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, ‘पक्षाचे ‘संकल्प पत्र’ विकसित भारताच्या चार मजबूत स्तंभांना – तरुण, महिला, गरीब आणि शेतकरी सक्षम करेल.’ असे म्हटले आहे.
50,000 रुपयांची कर्जमर्यादा वाढवून ती देशातील खेड्यापाड्यात आणि शहरांपर्यंत वाढवली जाईल, असे आश्वासन भाजपच्या जाहीर नाम्यात देण्यात आले होते. तसेच ७० वर्षांवरील वृद्धांना आयुष्मान योजनेच्या कक्षेत आणून मोफत उपचाराची सुविधा मिळणार आहे. आणखी तीन कोटी घरे बांधण्याचा ठराव घेण्याचे आश्वासन जाहीरनाम्यात देण्यात आले आहे. त्याचबरोबर आता स्वस्त स्वयंपाकाचा गॅस प्रत्येक घरात पाईपद्वारे पोहोचवला जाणार आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान मोदींच्या 10 मोठ्या घोषणा Modi’s guarantee ।
* रोजगार आणि उद्योजकतेभर भर
* मोफत रेशन योजान पुढील पाच वर्ष सुरु राहणार
* आयुषमान भारत योजनेअंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंत विमा आणि मोफत उपचार, 70 वर्षांवरील वृद्धांना आयुषमान भारत योजनेचा लाभ मिळणार, तृतीयपंथीयांना आयुषमान भारत योजनेचा लाभ मिळणार
* गरीबांसाठी चार कोटी घरे बांधणार
* पाईपमार्फत स्वस्त गॅस घराघरात पोहोचवणार
* वीजबिलाचा शून्य करण्यासाठी काम करणार, कोट्यवधी कुटुंबांचे वीज बिल शून्यावर आणण्यासाठी आणि विजेपासून कमाईच्या संधी निर्माण करण्यासाठी आम्ही काम करू. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना लागू करणार
*गरीबांसाठी अनेक योजनांचा विस्तार
* कृषी क्षेत्रावर विशेष लक्ष, देशात फूड प्रोसेसिंग हब बनणार, नॅनो युरियाच्या वापरावर भर देणार
* महिलांसक्षमीकरणासाठी प्रयत्न करणार, सर्व्हायकल कॅन्सरच्या उपचारावर भर, 3 कोटी महिलांना लखपती दिदी करणार, महिला बचत गटांना माहिती तंत्रज्ञान, शिक्षण, आरोग्य आणि पर्यटन या क्षेत्रात प्रशिक्षण देणार
* मुद्रा योजना 10 लाखांवरून 20 लाखांवर, मुद्रा योजनेंतर्गत यापूर्वी 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जात होते. आता ही मर्यादा वाढवून 20 लाख करण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. मला विश्वास आहे की इंडस्ट्री 4.0 च्या युगासाठी आवश्यक असलेली इकोसिस्टम तयार करण्यासाठी एक नवीन शक्ती म्हणून याचा वापर केला जाईल.