नवी दिल्ली – सुरक्षा व्यवस्थेत गंभीर त्रुटी असल्याचा आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाबमधील नियोजित कार्यक्रम सोडून नवी दिल्लीला परतले. त्यानंतर या मुद्द्यावरून केंद्रीय गृहमंत्रालयाने या प्रकरणावर राज्य सरकारकडून स्पष्टीकरण मागावले आहे.
If someone feels unsafe in India they should go to PAKISTAN – This Bollywood actor & his wife.
— Kunal Kamra (@kunalkamra88) January 5, 2022
पंतप्रधानांच्या नियोजित मार्गावर निदर्शने सुरू झाल्याने उड्डाण पुलावर मोदी यांना सुमारे 15 मिनिट अडकून पडावे लागले. असं असतानाच आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही पंजाब सरकारवर टीका केली.
याच मुद्यावरून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी सह अनेक भाजप नेत्यांनी यांनी पत्रकार परिषद घेऊन पंजाब सरकारवर आणि काँग्रेसवर टीका केली आहे.
तर विरोधी पक्षाने या घटनेवरून मोदींवर निशाणा साधला आहे. यातच स्टॅंड अप कॉमेडिअन कुणाल कामरा हा नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहतो. त्याने या घटनेवरून मोदींवर टीका केली आहे.
कुणाल कामरा म्हणाला,‘ज्यांना भारतात राहायला असुरक्षित वाटत असेल त्यांनी पाकिस्तानात जावं’, असा टोला कुणाल कामरा याने ट्विटरवरून लगावला आहे. भाजप विरोधात वक्तव्य करणाऱ्या अनेकांना भाजप नेत्यांनी डिबेट शो मधून किंवा इतर ठिकाणी पाकिस्तानात जाण्याचा सल्ला दिला होता. त्यावरून कुणाल कामरा याने मोदींना टोला लगावला आहे.