नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना गरिबांच्या हातात सत्ता जाऊ द्यायची नाही असाच त्यांचा सारा रोख आहे. असा आरोप कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun kharge) यांनी केला आहे. छत्तीसगडमधील सुकमा शहरात एका प्रचार सभेला संबोधित करताना खर्गे म्हणाले की, सध्या राज्यात सत्तेत असलेली कॉंग्रेस त्यांच्या “जल-जंगल-जमीन” च्या अधिकाराच्या संरक्षणासाठी आदिवासींच्या लढ्यात नेहमीच त्यांच्या पाठीशी उभी आहे.
जेव्हा मोदीजींनी (Modi) संसदेच्या नवीन इमारतीची पायाभरणी केली तेव्हा तत्कालीन राष्ट्रपती राम नाथ कोविंद (RamNath kovind) यांना आमंत्रित करण्यात आले नव्हते,विद्यमान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना उद्घाटनासाठी आमंत्रित केले गेले नाही. कारण त्या अनुसूचित जमातीच्या आहेत असा आरोपही त्यांनी केला. मोदी आणि शहा हे दोनच लोक असे काम करू शकतात असा आरोपही खर्गे यांनी केला.
पंतप्रधान मोदींना गरिबांच्या हातात सत्ता जाऊ द्यायची नाही हीच त्यांची मानसिकता आहे. कॉंग्रेसला शिव्याशाप देण्याशिवाय भाजपचे नेते दुसरे काहीही करीत नाहीत असेही ते म्हणाले. ते म्हणाले की मी येथे केवळ मते मागण्यासाठी आलो नाहीं तर अदिवासी, संविधान लोकशाही आणि देशाचे रक्षण करण्यासाठी तुमची मदत मागायला आलो आहे असेही ते म्हणाले.