मुंबई – राज्यात भोंगा प्रकरणावरून राजकीय वातावर चांगलेच ढवळून निघाले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या सभेमध्ये भोंग्यांचा प्रश्न उपस्थित केला त्यानंतर राजकीय नेत्याकडूंन आरोप-प्रत्यारोप होताना दिसून येत आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका करताना त्यांना ‘खाज ठाकरे’ असा उल्लेख केला आहे. मिटकरी यांच्या टीकेला आता मनसेकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
राष्ट्रवादीच्या गॅस वर तयार झालेल्या मटण करींनी जरा सांभाळून, ही मटण करी आमचे महाराष्ट्र सैनिक कधी संपवून टाकतील ते कळणार पण नाही. तेंव्हा चड्डीत राहायचं काय समजलं?
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) April 20, 2022
राष्ट्रवादीच्या गॅस वर तयार झालेल्या मटण करींनी जरा सांभाळून, ही मटण करी आमचे महाराष्ट्र सैनिक कधी संपवून टाकतील ते कळणार पण नाही. तेंव्हा चड्डीत राहायचं काय समजलं? असे खोचक प्रत्युत्तर मनसेकडून आमदार अमोल मिटकरी यांना देण्यात आले आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीट करत हे प्रत्युत्तर दिले आहे.
इस्लामपूरमध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संवाद मेळाव्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांचा उल्लेख ‘खाज ठाकरे’ असा केला होता. यावेळी अमोल मिटकरी म्हणाले वाढती महागाईवर ते बोलत नाहीत. पेट्रोल, गॅसवर, डिझेलवर बोलत नाहीत. नकला करतात. चांगला टाइमपास होत आहे. साहेबांवर (शरद पवार) बोलले म्हणून मी खाजसाहेब बोललो. निसर्गाने आम्हालाही दोन हात, पाय, डोकं आणि त्यात मेंदू दिला. पण मेंदू कोणाचा गुलाम ठेवावा याचं भान दिले, असा खोचक टोला त्यांनी लगावला होता याला आता मनसेकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे.