नवी दिल्ली – एकेकाळी देशातील सर्वात मोठा काँग्रेस पक्ष म्हणून काँग्रेसची ओळख होती. आजही आहे ,मात्र ती ओळख बदलली आहे. ग्रामपातळी पासून – देशपातळी वरील नेतृत्व यावर सर्वत्र चर्चा होताना दिसते. नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडुणकामध्ये काँग्रेसला अपेक्षित असे यश मिळविता आले नाही. त्यामळे भविष्यात या यशाची पुनरावृत्ती होऊ नये साठी त्यांनी बैठका घेण्यास सुरवात केली आहे. याचबरोबर आगामी होणाऱ्या सर्वच प्रकारच्या निवडणुकांची रणनीती काय असणार, कोणते बदल अपेक्षित आहेत यासाठी दिल्लीत बैठका सुरु आहेत.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी बुधवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. प्रशांत किशोर यांनी दिलेल्या सूचनांवर विचारमंथनाची फेरी पुढील एक-दोन दिवस चालणार आहे. याच क्रमाने काँग्रेस अध्यक्षांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत किशोर यांनी गेहलोत आणि बघेल यांच्यासमोर आपली रणनीती मांडली.
दोघांनीही सूचना केल्या. यावेळी काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, ज्ये÷ नेते अंबिका सोनी आणि सुरजेवाला उपस्थित होते.काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी प्रशांत किशोर यांच्या सूचनांवर विचार करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे पक्षसंघटना अधिक प्रभावी करण्यासाठी दोन्ही मुख्यमंत्र्यांकडून त्यांच्या सूचना घेणे आवश्यक असल्याने त्यांच्याशी चर्चा झाल्याचे ते पुढे म्हणाले.