वाघोली ( प्रतिनिधी) : वाघोली येथील केसनंद फाटा चौक येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनसेचे विधी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. गणेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली पुणे महानगरपालिकेच्या विरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला.
वाघोली ग्रामपंचायतीने महावितरणचे दिड कोटी विजबील थकवलेले असल्याने महावितरणने पथदिव्यांचे विज कनेक्शन तोडल्यामुळे पथदिवे बंद आहेत त्यामुळे नागरीकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
नुकतीच वाघोली ग्रामपंचायत पुणे महानगर पालिकेत समविष्ट झाली असल्याने थकीत विजबील भरण्याची जबाबदारी ही महानगरपालिकेची आहे. वाघोली येथील पथदिवे चालु करण्यासाठी मनसेच्या वतीने निषेध नोंदवण्यात आला.
यापुढे मनसे नागरिकांच्या हक्कांसाठी आक्रमकपणे काम करणार असल्याचे विभाग अध्यक्ष प्रकाश जमधाडे यांनी सांगितले. या प्रसंगी दत्ता व्यवहारे,सुनिल विटकर, हितेश बो-हाडे, काका गायकवाड, मंगेश सातव, आनंद राजीवाडे, रोशन नवले, अजय पालवे, स्वप्नराज खेडकर,गोरक्ष म्हस्के, अनिकेत मुळीक, तुषार चव्हाण, गणेश तापकीर, रितेश बो-हाडे, श्रीराज जाधव, जगदिश चौधरी, रुतिक आव्हाळे आदी उपस्थित होते.