ब्राम्हणी येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ
योजना विधानसभेपूर्वी पूर्ण करण्याची घोषणा
ना. बबनराव लोणीकर यांच्याकडे तांदुळवाडी, मोकळ ओहोळ व चेडगाव येथील ग्रामस्थांनी योजनेत समाविष्ठ करण्याची मागणी केली असता 69 कोटींची असणारी योजना नवीन गावांच्या समावेशामुळे पूर्ण 100 कोटींची करून विधानसभेपुर्वी पूर्ण करण्याची घोषणा ना.लोणीकर यांनी केली.
राहुरी – राज्य शासनाच्या कोणत्याही विभागाकडून निधी मिळविण्यात माहीर असल्याने आमदार कर्डिले सोडून तिकीट देण्याचा प्रश्नच येत नाही. उलट यावेळी त्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे असे राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. बबनराव लोणीकर यांनी सांगितले.
राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथे राष्ट्रीय पेयजल योजने अंतर्गत ब्राम्हणी व इतर चार गाव पाणीपुरवठा योजनेच्या कामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार शिवाजीराव कर्डिले होते. व्यासपीठावर ज्येष्ठ नेते ऍड. सुभाष पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष विक्रम तांबे, विकास मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब तनपुरे, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गायकवाड, बाळकृष्ण बानकर, ज्येष्ठ संचालक नामदेव ढोकणे, बाजार समितीचे सदस्य सुरेश बानकर, महेंद्र तांबे, सरपंच प्रकाश बानकर, योजनेचे अध्यक्ष अनिल दोंड, विजय बानकर, गोरक्षनाथ तारडे, शिवाजी सयाजी गाडे, उत्तम आढाव, सुरसिंग पवार आदी उपस्थित होते.
ना. बबनराव लोणीकर म्हणाले, ब्राह्मणी व इतर चार गाव पाणीपुरवठा योजनेसाठी आ.कर्डिले यांनी रात्रंदिवस पाठपुरावा करून योजना मंजूर करून घेतली. जिल्ह्यात अनेक अपूर्ण असलेल्या योजनांसाठी सुमारे 80 कोटी रुपये खर्च करून पूर्ण करण्यात आल्या. मुख्यमंत्री पेयजल योजनेमुळे अनेक ठिकाणी कामे करता आली. आ. कर्डिले यांनी राहुरी मतदार संघात राज्य शासनाकडून मुख्यमंत्री पेयजल मधून 52 कोटींचा निधी मिळाल्याने अनेक प्रश्न मार्गी लागल्याचे सांगितले.
यावेळी ऍड. सुभाष पाटील, विक्रम तांबे, सुरेश बानकर, विजय बानकर, उपसरपंच दत्तात्रय तरवडे, अनिल दोंड आदींची भाषणे झाली.कार्यक्रमास सरपंच अमोल भनगडे, नानासाहेब गागरे, जब्बार पठाण, नगरसेवक शहाजी ठाकूर, अशोक रेबडे, ज्ञानदेव क्षिरसागर, उपसरपंच रामराव पेरणे, इंद्रभान पेरणे, गणपत पेरणे, प्रभाकर धसाळ, सुखदेव खाटेकर, शिवाजी खडके, तात्यासाहेब धागुडे, संतोष धसाळ, अशोक तोडमल, अर्जुन धसाळ, पर्वतीशंकर पेरणे, बापू लोखंडे, मल्हारी लोखंडे, कांतीलाल डुक्रे, अरुण धसाळ, गोरख मोरे, मच्छिंद्र चव्हाण, नामदेव धसाळ, गोरख डोईफोडे, भाऊसाहेब धागुडे, मच्छिंद्र लोखंडे, दत्तात्रय चव्हाण, प्रभाकर हरिश्चंदे, कुंदन बाचकर, संदीप गिते, विजय कानडे, अरुण धामोरे, शिवाजी साठे, अरुण धसाळ, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे सर्व अधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.