वर्धा : हिंगणघाट तालुक्याती कानगाव येथे बुधवारी भूकंपाचे सौम्य धक्का जाणवला. अचानक घडलेल्या प्रकारामुळे गावातील नागरिकांत घबराट पसरली आहे. सदरील घटनेची हिंगणघाट तहसीलदारांनी नोंद केली आहे.
दुपारी 3 वाजेच्या सुमारास जमिनीत जोराचा आवाज झाला. जमिनीला धक्के बसत असल्याने घरातील वस्तू जमिनीवर कोसळल्या. त्यामुळे नागरिकांनी घरातून पळ काढला. घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.
घडलेला प्रकार ग्रामस्थानी प्रशासनास सांगितला. त्यावर हिंगणघाटच्या तहसीलदारांनी अधिकाऱ्यांना घडलेल्या घटनेची शहानिशा करण्यास सांगितले आहे. तहसीलदार श्रीराम मुदंडा यांनी सांगितले की, वर्धा जिल्हा प्रशासनाला घटनेची माहिती देण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत घटनेची शहानिशा करण्यात येईल असं ते म्हणाले. या व्यतिरिक्त कोसुरला, मोझारी, भिवापूर, परिसरात भूकंप झाल्याची माहिती ग्रामस्थानी दिली आहे, याबत आपण तात्काळ तहसीलदारांना सदरील घटनेची माहिती दिल्याचे तलाठी संजू आंबादे यांनी सांगितलं.