IPL 2024 ( MIvsRR Match 15) Hardik Pandya Statement :- हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सला IPL 2024 मध्ये सलग तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात मुंबईचा घरच्या मैदानावर वानखेडे स्टेडियमवर 6 गडी राखून पराभव झाला. आतापर्यंत हार्दिकचे कर्णधारपद एमआयसाठी अपयशी ठरले आहे. हार्दिक कर्णधार होण्याआधीच चाहते संतापले होते आणि आता संघाच्या खराब कामगिरीमुळे त्यात अधिकच भर पडली आहे. त्यामुळे पराभवाची हॅट्ट्रिक साधल्यानंतर मुंबईच्या कर्णधाराने कोणाला जबाबदार धरले? हे जाणून घेऊया…
सामना संपल्यानंतर हार्दिक पांड्या म्हणाला, ” होय, एक कठीण रात्र, आम्हाला हवी तशी सुरुवात मिळाली नाही. मला पलटवार करायचा होता, आम्ही 150-160 धावा करण्याच्या चांगल्या स्थितीत होतो, पण माझ्या विकेटमुळे त्यांना सामन्यात आणखी पुढे जाण्याची संधी मिळाली. मला अजून खूप काही करायची गरज होती, पण ठीक आहे. आम्हाला अशा विकेटची अपेक्षा नव्हती, परंतु तुमच्याकडे नेहमीच फलंदाज असू शकत नाही, कधीकधी गोलंदाजांनी त्यांचे म्हणणे मांडणे चांगले असते.”
हार्दिक पुढे म्हणाला, “हे सर्व योग्य गोष्टी करण्याबद्दल आहे. काहीवेळा योग्य परिणाम होतात आणि काहीवेळा नाही. एक संघ म्हणून आम्हाला खात्री आहे की आम्ही बरेच चांगले करू शकतो, परंतु आम्हाला अधिक शिस्तबद्ध राहण्याची आणि खूप धैर्य दाखवण्याची गरज आहे.”
IPL 2024 : मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार ‘रोहित शर्मा’च्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद…
मुंबईची फलंदाजी झाली खूपच खराब…
वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या मुंबई संघाला 20 षटकांत 9 बाद 125 धावाच करता आल्या. संघाचे पहिले तीन फलंदाज गोल्डन डकला बळी पडले, ज्यात रोहित शर्मा, नमन धीर आणि देवाल्ड ब्रेस्विस यांचा समावेश होता. संघात फक्त कर्णधार हार्दिक पंड्या आणि तिलक वर्मा यांनी 30 धावांचा टप्पा ओलांडला होता. हार्दिकने 34 आणि टिळकने 32 धावा केल्या. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सने 15.3 षटकांत 4 गडी राखून विजय मिळवला.