सत्तास्थापनेबाबत लवकरच निर्णयाची शक्यता
नवी दिल्ली : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मंगळवारी मल्लिकार्जुन खर्गे, ए. के. ऍटोनी आणि अहमद पटेल यांच्यासोबत बैठक घेतली. यात महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. त्यामुळे राज्यातील सत्ता स्थापनेबाबत कॉंग्रेसची भूमिका लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला आव्हान देणाऱ्या भाजपाची पाळेमुळे खणून काढू,असे आव्हान शिवसेनने दिले. राजकीय अरेरावीचा अंत होण्याची सुरवात झाली आहे, असे सांगत पक्षाचे मुखपत्र सामनामध्ये महंमद घौरीला अनेकदा जीवदान देणाऱ्या पृथ्वीराज चौहान यांची घौरीनेच हत्या केली याचा दाखला देत महाराष्ट्रात शिवसेने अशा कृतघ्न लोकांना सहन केले. आता ते आमच्या पाठीत खंजीर खुपसत आहेत, असे ते म्हणाले.
राज्यतील सध्याची राजकीय अस्थिरता संपुष्टात आणण्यासाठी कॉंग्रेस, राष्ट्रावादी आणि शिवसेनेतील सात्तावाटपाचे सूत्र जवळपास निश्चित झाले आहे. मुख्ययमंत्री पदाबाबत पक्षप्रमुख उध्दव ठाकरे ठाम आहेत. मात्र, कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही, असे धोरण त्यांनी ठरवले आहे, असे शिवसेनेतील सुत्रांनी सांगितले. दरम्यान कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी एक उपमुख्यमंत्रीपद आणि दोन्ही कॉंग्रेस ठरवतील तो विधानसभेचा अध्यक्ष अशी भूमिका घेण्यात आल्याची माहिती खात्रीलायकरित्या समोर येत आहे. बिगर भाजपा सरकार आणण्यामागे शरद पवार महत्वाची भूमिका साकारत आहेत, मात्र त्याबाबत स्वत:चे नाव ते जोडू इच्छित नाहीत, असे राष्ट्रवादीतील सूत्रांनी सांगितले.
दरम्यान शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले, जिंदगी मे कुछ कामनेका है तो तरकिबे बदलो। इरादे नही। सोनिया गांधी यांची भेट घेऊन आल्यानंतर शरद पावार यांना सोमवारी संजय राऊत भेटले. त्यावेळी त्यांनी लवकरच महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकार येईल असे सांगितले होते.