कान्हे – मावळ तालुक्यातील नाणे मावळ, पवन मावळ व अंदर मावळ परिसरात शेतीच्या कामांना सुरुवात झाली आहे. शेतकरी पारंपारिक शेती न करता यंत्राच्या साह्याने शेतीवर भर दिला जात आहे. गेल्या काही वर्षात मावळ तालुक्यात पारंपारिक बैल जोडीने शेती करण्याकडील कल कमी होऊ लागला आहे त्यामुळे ग्रामीण भागातील पशुधन ही घट होताना दिसत आहे.
जनावरे चरण्यासाठी सोडण्यात असलेले जागा आता दिवसेंदिवस अतिक्रमेच्या विख्यात येत आहे जनावरांसाठी चारा कमी होत असल्याने सरांचा मोठा प्रश्न निर्माण होत चालला आहे. त्यामध्ये लम्पीसारखे आजार द्भवत आहेत. त्यामुळे पशूधनातही घट होत आहे. कृषी क्षेत्रात होत असलेले नुकसानीमुळे पशूधनावर जास्त लक्ष नसल्याने दिवसेंदिवस पशूधनामध्ये घट होत आहे.
पाऊस काळामध्ये शेतीमध्ये चिखल करण्यासाठी नांगरणीसाठी बैलजोडीचा वापर केला जात असे. मात्र ती जागा आता ट्रॅक्टरद्वारे केली जात आहे.शेतीचा हंगाम संपल्यानंतर बैल वर्षभर सांभाळण्यासाठी अनेकांना शक्य होत नाही. त्यातच यांत्रिक शेतीमुळे शेतीची कामे कमी वेळेत आणि कमी खर्चात होतात. त्यामुळे शेतकरी यांत्रिक शेतीवर भर दिला जात आहे .शेतकरी नांगरणीसाठी तसेच शेतीतील विविध कामासाठी यंत्राचा वापर करताना दिसत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात आता शेतीसाठी बैलजोडी ऐवजी यंत्राचा वापर होत आहे