मुंबई – श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरून निघाला आहे. या प्रकरणावर सर्व स्तरातून तीव्र प्रतिक्रिया येत असून आरोपला कडक शिक्षा मिळावी अशी मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, श्रद्धानं दोन वर्षांपूर्वी नवी मुंबई पोलिसांकडे आफताबविरोधात तक्रार दाखल केल्याचं समोर आलं आहे. तेव्हाच पोलिसांनी कारवाई केली असती, तर श्रद्धाचा जीव वाचला असता अशी टीका आता भाजपाकडून महाविकास आघाडीवर केली जात आहे.
दरम्यान महाराष्ट्र भाजपच्या ट्विटर हॅण्डलवरून ट्विट करण्यात आले आहे की, ‘लव्ह जिहाद’ला बळकटी देण्याचे महाविकास आघाडीचे काम! श्रद्धा वालकरने पाठविलेल्या तक्रार स्वरूपी चिठ्ठीची मविआ आणि पोलिस विभागाने योग्य वेळी दखल घेतली असती तर आज श्रद्धा त्या नराधमाच्या तावडीतून सुटली असती. श्रद्धाच्या खूनाला आफताब इतकीच महाविकास आघाडीही जबाबदार आहे! असं म्हणत मविआ वर टीका करण्यात आली आहे.
या टीकेला आता काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्वीटद्वारे सडेतोड उत्तर दिले आहे. ‘श्रध्दा ची हत्या झाली दिल्लीला! तीचे तुकडे करुन तो नराधम दिल्लीजवळील जंगलात फेकत असताना मोदी सरकार आणि दिल्ली पोलिस आबाधुबी आणि गोट्या खेळत होते. नाही का? बरे ते लोढा कमिटी मध्ये लिव्ह इन रिलेशनशिप चा उल्लेख का नाही बरं? ‘ असं म्हणत भाजप पक्षाला प्रश्न विचारला आहे.