आळंदी – भेटी लागे जीवा लागलीसे आस… या उक्तीप्रमाणे तब्बल दोन वर्षे पंधरा दिवस माऊलींचे द्वार करोनाच्या महामारीमुळे बंद ठेवण्यात आले होते. मात्र राज्य शासनाकडून करोनाचे निर्बंध उठवल्यानंतर भाविकांना थेट माऊलींचे दर्शन घेता येणार आहे. गेल्याच महिन्यात करोनाचे संकट जवळ जवळ संपुष्टात आल्याने राज्यातील काही तीर्थक्षेत्र यापूर्वीच सुरू करण्यात आली आहेत;
मात्र पंढरीचा विठुराया व अलंकापुरीचा ज्ञानोबाराया यांची द्वारे मात्र महाराष्ट्रीयांचा गोड असा सण म्हणजे गुढीपाडवा या दिवसापासून सुरू होणार आहे. विठू भेटीसाठी आतुर झालेले विठ्ठल भेटीची आस कायमच मनात असलेले लाखो भाविकांना पुन्हा ही भेट शनिवारपासून होणार आहे. या दिवसाची लाखो भाविक आतुरतेने वाट पाहू लागले आहेत.
त्यानुसार गुढीपाडव्यापासून ते पूर्वीप्रमाणेच खुले ठेवण्याचा निर्णय आळंदी देवस्थान कमिटीच्या वतीने देण्यात आला आहे. महाद्वारातून भाविक मंदिरात प्रवेश करतील व पान दरवाजा तसेच पूर्वेकडील हनुमान दरवाजा या दोन्ही मार्गाने भाविकांना मंदिरातून बाहेर पडता येईल, असेही देवस्थानच्या वतीने चांगल्या सांगण्यात आले.