Sanjay Raut – आगामी लोकसभा निवडणूकी अगोदर भाजप काही तरी मोठा बॉम्बस्फोट घडवून आणणार असल्याची भीती खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली. त्याशिवाय भाजपला निवडणूका जिंकणे अशक्य आहे, असे गंभीर आरोपही त्यांनी केला.
तसेच राम मंदिराचा मुद्दा घेऊन भाजप उत्तर प्रदेशासह देशभरात मार्केटिंग करत आहे. यासाठी गावागावात ते ट्रेन सोडत आहेत. भारतातील बेरोजगारीच्या समस्येवर बोलत नाहीत, असे राजकारण कधीपर्यंत चालणार असा सवालही त्यांनी केला.
सोलापूर येथे आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. संजय राऊत म्हणाले, राजस्थान भाजपच्या हाती सत्ता आली आहे. वसुंधरा राजे यांना अजूनही होल्डवर ठेवण्यात आल्याबाबत चर्चा सुरू आहे. भाजपसाशित राज्यात कोण मुख्यमंत्री व्हायचे हे ठरवले जात.
पार्टी अंतर्गत मिटिंग घेऊन निर्णय घेतले जातात. देशात पंतप्रधान आणि गृहमंत्री हे फिक्स आहेत. बाकी कुणाचे फिक्स नाही. मुख्यमंत्री किंवा मंत्री आणि राज्यपाल कुणीही फिक्स नाही, असा टोला त्यांनी लगावला.
2024च्या लोकसभा निवडणुकी अगोदर देशात मोठा बॉम्बस्फोट घडवल्याशिवाय भाजप निवडणूक जिंकणार नाही. यापूर्वी, पुलवामा घटना घडल्यानंतर त्यावेळेचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी स्पष्ट केले. सत्यपाल मलिक यांच्या स्पष्टीकरणावर भाजपमध्ये उत्तर देण्याची हिंमत दाखवली नाही, अशी टीकाही त्यांनी केली.