Manoj Jarange Patil – माझा मार्ग राजकारणाचा नाही. पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनच ओबीसीतून मराठा आरक्षण घेतल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. सरकारने आपली मर्यादा ओलांडली तर मराठे त्यांचा बरोबर कार्यक्रम करतील, असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी सरकारला दिला आहे.
जनतेने देवेंद्र फडणवीस यांना गादीवर बसवले. पण ते हेतुपुरस्सर दहशत निर्माण करत असतील तर आम्ही सहन करणार नाही. आम्हालाही काही मर्यादा आहेत. पूर्वी राजा न्याय द्यायचा.
पण आताच्या राजांना दया-माया नाही. जनता बिथरली तरी 3 राजे न्याय देऊ शकत नाहीत. एक राजा न्याय देत असेल तर इतर दोघांनी त्याला साथ द्यावी, असे मनोज जरांगे म्हणाले.
सरकारपुढे सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नसल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. पुढील ५-६ दिवस शांत राहा.
त्यानंतर पुढाऱ्यांनी आमच्या दारात यायचे नाही असे पॉम्पलेट आपल्या दारावर लावा. सरकारने मर्यादा ओलांडली तर मराठे बरोबर कार्यक्रम करतील, असेही जरांगे यावेळी म्हणाले.
मला कधीही अटक होईल । Manoj Jarange Patil
सत्तेत मी काटा आहे, मला कधीही अटक होण्याची शक्यता असून, त्याबाबत अहवाल देखील तयार आहे, असा दावाही जरांगे पाटील केला आहे. तर न टिकणारे दहा टक्के आरक्षण मराठ्यांना देण्यात आले आहे. त्यासाठी आमच्यावर गुन्हे दाखल करणे सुरू आहेत. सरकारने आमची फसवणूक केली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.