Manoj Jarange Patil। मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे अंतरवाली सराटीमध्ये काल दुपारी प्रचंड आक्रमक झाल्याचे दिसून आले. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये यासाठी देवेंद्र फडणवीस प्रयत्न करतायेत. त्यांना माझा बळी हवा आहे असा खळबळजनक आरोप जरांगे यांनी केला होता.
त्यानंतर त्यांनी मुंबईकडे कूच केली होती. मात्र आज त्यांनी त्यांचा निर्णय मागे घेतला असल्याचे सांगण्यात आलं. तसेच, त्यांनी गेल्या १६ दिवसांपासून सुरु असलेले आपलं आमरण उपोषण स्थगित करण्याचा देखील निर्णय घेतला आहे. । Manoj Jarange
आज अखेर त्यांनी हे उपोषण मागे घेतलं असून, आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेणार, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे. दरम्यान, मनोज जरांगे यांनी आज उपोषण सोडलं असलं तरी साखळी उपोषण सुरुच राहणार. तसेच दोन दिवसात चर्चा करुन पुढची दिशा ठरवणार, असं देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
यावेळी बोलताना जरांगे पाटील म्हणाले, “आमच्या डॉक्टरांना बोलावलं आहे. उपचाराला कुठे जायचं ते आम्ही ठरवू. उपचार इथे घ्यायचे की दुसरीकडे जायचं ते आम्ही ठरवू. पण मी हटणार नाही. मी प्रामाणिकपणे सांगतो, देवेंद्र फडणवीस यांची ही जबाबदारी होती.
ती जबाबदारी मी पार पाडली. 5 हजार महिला होत्या आणि 25 हजार लोकं होतं. देवेंद्र फडणवीस यांना रात्रीच काहीतरी घडवून आणायचं होतं. लोकं सैरावैरा रानात किती पळाले असते. देवेंद्र फडणवीस यांना दुसऱ्यांदा लाठीचार्ज घडवून आणायचा होता. मी राज्य बेचिराख होण्यापासून वाचवलं आहे.असा दावा मनोज जरांगे यांनी केला.
मुंबईकडे निघालेले मनोज जरांगे माघारी फिरले । Manoj Jarange
मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली होती. त्यांची जीभ घसरल्याने वाद निर्माण झाला होता. त्यानंतर भाजप नेत्यांनी मनोज जरांगे पाटील यांना लक्ष्य केले होते. । Manoj Jarange
यावेळी मनोज जरांगे यांनी फडणवीसांच्या सागर बंगल्यावर जाणार असल्याचे म्हटले होते. ते मुंबईच्या दिशेने निघालेही होते. परंतु, पोलिसांनी त्यांच्या सहकाऱ्यांची धरपकड करत संचारबंदी लागू केल्यानंतर मनोज जरांगे यांनी मुंबईला जाण्याचा निर्णय रद्द केला होता. ते पुन्हा अंतरवाली सराटीला पोहोचले होते.