Manoj Jarange | मराठा आरक्षणासाठीच्या सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय आंदोलन मागे नाहीच, असा निर्धार मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. मागासवर्ग आयोगाने अहवाल दिला असून 20 फेब्रुवारीपर्यत सरकारने निर्णय घ्यावा. तसेच सरकारने धोरण ठरवले अले तरी मराठेही धोरण ठरवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
आंतरवाली सराटी येथील आंदोलनस्थळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जरांगे-पाटील म्हणाले, ‘ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत आणि ज्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांना सग्यासोयऱ्याचा कायदा आहे, त्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही.
मराठवाड्यातील सगळा मराठा कुणबी आहे. कुणबी नोंदी सापडल्या त्यांना आरक्षण द्यावेच लागेल. मात्र मागासवर्गीय अहवाल घेऊन ते आरक्षण देताल, तर मात्र ते चालणार नाही, सग्या सोयऱ्यांची अंमलबजावणी केल्याशिवाय कोणाला सोडणार नाही, असेही जरांगेनी म्हटले आहे.