पुणे – पिण्याच्या पाण्याच्या उच्च गुणवत्तेसाठी प्रसिद्ध असलेले नामांकित माणिकचंद “ऑक्सिरिच पॅकेज्ड वॉटर’ आता नव्या रुपात समोर आले आहे. निळ्या रंगाचे लेबल असलेल्या कंपनीच्या पाण्याची बाटली आता लाल आणि पांढऱ्या रंगातील अधिक आकर्षक स्वरुपात ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. या नव्या बदलांमुळे माणिकचंद ऑक्सिरीचप्रमाणे पाण्याच्या बाटलीची कॉपी करून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांना आळा बसणार आहे.
भारतातील नामांकित पॅकेज्ड वॉटरमध्ये माणिकचंद “ऑक्सिरिच’ हा आघाडीवर असलेला ब्रॅन्ड आहे. सन 2002 पासून ग्राहकांना गुणवत्ता आणि ऑक्सिजनयुक्त पाण्याचा पुरवठा करणाऱ्या या कंपनीच्या बाटलीचे लेबल हे निळ्या रंगाचे होते. मात्र माणिकचंद “ऑक्सिरिच’ कंपनीची बाजारात असलेली ओळख, प्रसिद्धी व गुणवत्ता लक्षात घेऊन 500 पेक्षा जास्त लोकल कंपन्यांनी “ऑक्सिरिच’ प्रमाणेच नामसाधर्म्य आणि बाटलीला लेबल लावून त्यांचे ब्रॅन्ड बाजारात आणले होते. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होत होती.
ही बाब लक्षात घेऊन कंपनीने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे माणिकचंद “ऑक्सिरिच’ पाण्याच्या बाटलीला असलेले निळ्या रंगाचे लेबल बदलून त्याऐवजी आता लाल व पांढऱ्या रंगाच्या लेबलमध्ये नव्या स्वरुपात ग्राहकांसमोर आणले आहे. त्यामुळे ग्राहकांना खरी “ऑक्सिरिच’ची बाटली ओळखणे सहज शक्य होणार आहे. विशेष म्हणजे, आता नव्या रुपातील माणिकचंद “ऑक्सिरिच’ची कॉपी करणाऱ्यांना कायदेशीर कारवाईचा सामना करावा लागणार असल्याचे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले. जे. डब्ल्यू. मेरीयट हॉटेल येथे आयोजित समारंभात ऑक्सीरिचचे देशभरातून आलेले वितरक, फ्रेंचायसी तसेच नामवंत उद्योजक उपस्थित होते.
“माणिकचंद “ऑक्सिरिच’ने नेहमीच ग्राहकांना गुणवत्तापूर्ण पाण्याचा पुरवठा करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे ग्राहकांनी आमच्यावर कायम विश्वास ठेवला असून त्याबद्दल मी त्यांची ऋणी आहे. आता कंपनीने केलेला नवीन बदल नक्कीच ग्राहकांच्या पसंतीला पडेल, अशी खात्री आहे.”- जान्हवी धारिवाल-बालन, अध्यक्षा, आरएमडी ग्रुप.