मदसौर – जागतिक लोकसंख्या दिवसाचे औचित्य साधून उत्तर प्रदेशातील योगी सरकारने लोकसंख्या नीतीची घोषणा केली आहे. तर आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी देखील लोकसंख्या नियंत्रणासाठी मोठा निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केलं आहे. त्यातच मध्ये प्रदेशातील भाजप खासदार सुधीर गुप्ता यांनी अनियंत्रीत लोकसंख्येसाठी बॉलिवूड अभिनेता आमिर खान याच्यासारखे लोक जबाबदार असल्याचं म्हटलं.
भाजप खासदार गुप्ता यांनी आमिर खानचे नाव घेत म्हटलं की, देशाची लोकसंख्या अनियंत्रित कऱण्यासाठी आमिर खान सारख्या लोकांचा हात आहे, हेच दुर्दैव्य आहे.
अनियंत्रीत लोकसंख्येसाठी आमिर खान सारखे लोक जबाबदार; भाजप नेत्याचे वक्तव्य pic.twitter.com/Y1z8rFlXc5
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) July 12, 2021
गुप्ता यांनी ट्विट करून म्हटलं की, आमिर खान याला पहिल्या पत्नीकडून दोन आपत्य आहे. दुसरी किरण राव आता मुलाला घेऊन कुठं भटकणार, तिची त्याला चिंता नाही. मात्र आता आमिर तिसरीच्या शोधात आहे. एका अभिनेत्याची ही शिकवण आहे का, असा प्रश्न खासदार गुप्ता यांनी उपस्थित केला आहे.