पारगाव शिंगवे, (वार्ताहर) – दहावी व बारावीचे वर्ष अत्यंत महत्वाचे असून अभ्यासाचे योग्य नियोजन तयार करा. आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जा. थोड्याशा अपयशाने खचून जाऊ नका पुन्हा नव्याने उभारी घ्या. कारण अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. स्वतःच्या पायावर उभे रहा आणि आई वडिलांच्या कष्टाचे सोने करा, असे युवा उद्योजक भाऊ तळेकर यांनी सांगतले
आंबेगाव तालुक्यातील रांजणी येथील रयत शिक्षण संस्थेचे नरसिंह विद्यालय येथे नुकताच एसएससी मार्च 2024 बॅचचा निरोप समारंभ व शुभ चिंतन सोहळा पार पडला. या शुभचिंतन सोहळ्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना भाऊ तळेकर बोलत होते.
यावेळी गावच्या सरपंच छायाताई वाघ, विद्यालयाचे प्राचार्य शिवाजी दुंडे, स्कूल कमिटीचे सदस्य मधुकर हांडे, एकनाथ भोर, बंडेश वाघ, पर्यवेक्षक राजेंद्र पडवळ, सर्व शिक्षक वृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदकुमार भालेराव यांनी केले तर अर्चना कांबळे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन नंदकुमार भालेराव यांनी केले तर अर्चना कांबळे यांनी आभार मानले.