बारामती (प्रतिनिधी) – औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) माळेगाव वसतिगृह दुरवस्थेबाबत बुधवारी (दि. 20) अभाविपने बारामती तहसीलदारांना निवेदन दिले.
आयटीआयमधील विद्यार्थ्यांना राहण्याच्या उद्देशाने माळेगाव येथे वसतिगृह उभारले आहे. त्याची अवस्था बिकट झाली आहे. तिथे राहण्यासाठी वसतिगृह आहेत. पण वसतिगृहात पूर्णपणे काटेरी झाडे आली आहेत. वसतिगृहात सोयी-सुविधा नाहीत. वसतिगृहात दूषित आहे. त्या ठिकाणी स्वच्छ पाण्याची व्यवस्था नाही. वसतिगृहाच्या सर्व खिडक्या फुटलेल्या आहेत.सुरक्षा भिंती व्यवस्थित नाही अशी परिस्थिती आहे.
प्रशासनाने विद्यार्थ्यांनाच वसतिगृह व्यवस्थित करून प्रवेश द्यावा, कॅमेरे बसवावेत, सुरक्षा भिंत वाढवावी, ओळखपत्र द्यावे, आंघोळीसाठी हिटरची व्यवस्था करा, कॅन्टीन सुरू करा, आदी मागण्या तहसीलदारांकडे केल्या आहेत. मागण्या मान्य केल्या नाही, तर 15 दिवसांत अभाविप तीव्र आंदोलन करेल, असा इशारा दिला. निवेदन देताना जिल्हा संयोजक वैभव सोलनकर, शहर सहमंत्री समीर मारकड, बाळासाहेब सोलनकर, अक्षय मोरे, सुजित सोरटे, तन्मय क्षीरसागर, अनुज अरगडे, संतोष हुलगे, जिल्हा विस्तारक शशिकांत टिंगरे उपस्थित होते.