Mahayuti Seat Sharing । लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी निवडणूक आयोगाकडून अधिसूचना जारी होऊनही राज्यातील सर्वच पक्षाच्या जागावाटपाचा तिढा काही केल्या सुटेना. सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडीमधील नेत्यांची नाराजी दूर करण्यात दिग्गज नेते अपयशी ठरताना दिसतायेत. या सर्व पार्श्वभूमीवर आता गल्लीतील भांडण चक्क दिल्लीपर्यंत गेल्याचे दिसतंय. दिग्गज नेत्यांना सुद्धा उमेदवारीचा पेच सुटत नसल्याने महायुतीमध्ये कमालीचा संघर्ष सुरू असल्याचे स्पष्ट झालंय. भाजपची पहिली यादी आल्यानंतर माढामध्ये वाद टोकाला गेलाय.
या ठिकाणी भाजपकडून रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर झाली असली, तरी त्यांच्या उमेदवारीला रामराजे निंबाळकर आणि मोहिते पाटील गटाकडून कडाडून विरोध करण्यात आलाय. त्याठिकाणी थेट उमेदवार बदलावा अशी मागणी सुरू आहे. दुसरीकडे, बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये सुद्धा महायुतीमध्ये आव्हान निर्माण झालंय. याठिकाणी विजय शिवतारे यांना समज देऊनही आपल्या निर्णयावर ते ठाम आहेत. त्यामुळे एकंदरीत सुनेत्रा पवारांविरोधात विरोध वाढत चालला आहे. हर्षवर्धन पाटील सुद्धा अजित पवारांच्या विरोधात उभे ठाकलेत.
अमरावतीमध्येही भाजपचा अंतर्गत कलह Mahayuti Seat Sharing ।
तर दुसरीकडे, अमरावतीच्या जागेवरून सुद्धा भाजपमध्ये डोकेदुखी वाढलीय. अमरावती लोकसभेला नवनीत राणा यांच्या उमेदवारीचे संकेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्यानंतर आता त्या ठिकाणी सुद्धा स्थानिक भाजप नेते विरोधात गेलेत. त्यामुळे नवनीत राणा यांना कमळाच्या चिन्हावरून अमरावतीमध्ये उतरवण्याचा भाजपचा डाव स्थानिक पातळी मोडीत निघू शकतो .
सोलापूरमध्येही सुद्धा आपण भाजपसाठी उमेदवारी ठरवताना आव्हान निर्माण झाला आहे. भाजपकडून सोलापूरचा उमेदवार बदलला जाणार हे निश्चित आहे. मात्र, उमेदवार ठरवण्यामध्ये स्थानिक नेत्यांमध्ये मतमतांतरे असल्याने हा सुद्धा तिढा सुटलेला नाही.
सातारमध्येही तिढा कायम Mahayuti Seat Sharing ।
गेल्या काही दिवसांपासून सातारमध्ये उमेदवार कोण असणार आणि जागा कोणाला सुटणार यावरती सुद्धा खल सुरू आहे. या ठिकाणी अजित पवार गटाकडून सुद्धा दावा करण्यात आला आहे. शिवसेना शिंदे गटाकडून सुद्धा दावा करण्यात आला आहे. मात्र, उमेदवारीचा घोळ अजून संपलेला नाही. गेल्या दोन दिवसांपासून भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी लोकसभा उमेदवारी मिळवण्यासाठी दिल्लीमध्ये तळ ठोकला आहे. मात्र, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी अजूनही झालेला नाही.
नाशिक जागेवरूनही रस्सीखेच
महायुतीमध्ये नाशिकची जागा शिवसेना शिंदे गटाची असली तरी त्या ठिकाणी सुद्धा भाजप आणि राष्ट्रवादीकडून दावा करण्यात आला आहे. ही स्थिती रामटेक कोल्हापूर आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघांमध्ये सुद्धा दिसून येत आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेला नारायण राणे यांच्या नावावर भाजपकडून शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. मात्र, याबाबत अजून स्पष्टता आलेली नाही.
विदर्भात वाद सुरुच
दुसरीकडे अजित पवार गटाकडून धाराशिव, गडचिरोली, सातारा या जागांवर भाजप आणि राष्ट्रवादीने दावा केला आहे, त्यामुळे सुद्धा अडचणीत वाढ पडली आहे यवतमाळ वाशिममध्ये सुद्धा भावना गवळी यांना विरोध होत आहे. त्यामुळे भाजपचे भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जोर लावून बसले आहेत. रामटेकची जागा आपल्याच ताब्यात घ्यावी अशी सुद्धा मागणी करण्यात आली आहे.