मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार
(Ajit Pawar) यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नऊ आमदारांनी आज महायुती सरकारमध्ये सामील होत राजभवनावर मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल रमेश बैस यांनी त्यांना राजभवनातील दरबार हॉलमध्ये पद व गोपनीयतेची शपथ दिली.
आज मंत्रिपदाची शपथ घेतलेल्यांमध्ये छगन चंद्रकांत भुजबळ, दिलीप दत्तात्रय वळसे- पाटील, हसन मियालाल मुश्रीफ, धनंजय पंडितराव मुंडे, धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम, आदिती सुनील तटकरे, संजय बाबूराव बनसोडे, अनिल भाईदास पाटील यांचा समावेश आहे.
दरम्यान, अजित पवारांनी महायुती सरकारला पाठींबा देण्याच्या निर्णयांमागचं कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.
त्यांनी म्हटलं आहे की, ” देशाला आणि राज्याला विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जाण्याची क्षमता फक्त आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी त्यांच्याकडे आहे. त्यामुळे विकासाच्या या प्रवाहात सामील होण्यासाठीच महायुती सरकारला पाठींबा देण्याचा निर्णय या सर्वांनी घेतला असल्याचे मत CM शिंदे व्यक्त केले.”
त्यांच्या सोबत येण्याने डबल इंजिन सरकार यापुढे बुलेट ट्रेनच्या वेगाने धावेल असा आशावाद यावेळी त्यांनी बोलताना व्यक्त केला.
शपथविधी सोहळ्या दरम्यान, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर rahul narwekar, उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्यासह मंत्रिमंडळातील सहकारी, विधानसभेचे सदस्य, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी वर्ग आदी उपस्थित होते.