मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : कापूरहोळ येथे स्वागत
कापूरहोळ- महाजनादेश यात्रेद्वारे सर्वांचा आशिर्वाद घेण्यासाठी आलो आहे. राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यावर पुन्हा तुमच्या भेटीला येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने कापूरहोळ (ता. भोर. येथे दिले.
भाजपचे बाळासाहेब गरुड, जीवन कोंडे, नाना साबणे, डॉ. नागेंद्र चौबे, विश्वास ननावरे, अमर बुदगुडे आदी पदाधिकाऱ्यांनी कापूरहोळ येथे महाजनादेश यात्रेचे स्वागत केले. कापूरहोळ येथील धाराऊमाता ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष अमित गाडे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना धाराऊ स्मारकाबाबत निवेदन दिले.