माधुरी दीक्षित आणि अक्षय कुमार हे बॉलीवूडमधील टॅलंटेड कलाकारांपैकी एक आहेत. मात्र, या दोन कलाकारांनी एकत्रितपणे खूप कमी चित्रपटांमध्ये काम केलेले आहे. “आरजू’ चित्रपटात अक्षय आणि माधुरी यांनी एकत्रित, तर “दिल तो पागल है’मध्ये अक्षय कुमारने कॅमियो रोल साकारला होता. माधुरीने आपल्या एका मुलाखतीत अक्षयबद्दल एक किस्सा शेअर केला जो यापूर्वी कधीही चाहत्यांनी ऐकला नसेल.
माधुरीने या जुन्या मुलाखतीत अक्षयशी संबंधित एक मजेदार सिक्रेट शेअर केले होते. ती म्हणाली होती की, खिलाडी कुमार अक्षय लोकांची घड्याळे चोरतो. ते ही समोरच्यालाही माहिती न होता तो अशा प्रकारे हे काम करत असे. तसेच माधुरीने एका रियलिटी शोच्या सेटस्वरही याबाबत उल्लेख करत म्हटले होते की, तिने हे सर्व करताना स्वत: पाहिले आहे. तो चेहऱ्याने जेवढा निष्पाप वाटतो, तो तेवढाच खोडकर आहे.
वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाल्यास माधुरी “कलंक’ चित्रपटात अखेरच्या वेळी झळकली होती. ज्यात वरुण धवन, आलिया भट्ट, आदित्य रॉय कपूर, सोनाक्षी सिन्हा आणि संजय दत्त मुख्य भूमिकेत होते. अक्षय कुमारविषयी बोलायचे झाल्यास त्याचे अनेक चित्रपट रांगेत आहेत. ज्यात “सूर्यवंशी’, “बेल बॉटम’, “बच्चन पांडे’ आदी चित्रपट आहेत. तसेच लॉकडाऊननंतर “बेल बॉटम’चे शूटिंग लंडनमध्ये सुरू होणार आहे.